आली दिवाळी

आली दिवाळी
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा क्षण! नवीन कपडे आणि खाण्याची लयलूट!! ह्या आनंदमयी प्रकाशपर्वाच्या निमित्त सर्वप्रथम आयु:श्री परिवारा तर्फे आपणा सर्वांना खुप खुप आरोग्यदायी शुभेच्छा!

आयु:श्री आयुर्वेदीय हाॅस्पिटल व रिसर्च सेंटर च्या माध्यमातून गेली २५ वर्षांपासून रुग्णांच्या आरोग्याची काळजी घ्ण्यीचे व्रत अंगीकारलेले आहेच. त्यामुळे आरोग्यदायी दिपावली साठी आमच्याकडून काही खास आरोग्याच्या टिप्स!

दिवाळी पासून हिवाळा असे पर्यंत रोज अंगाला सुगंधी तेल व सुवासिक उटणे लावून गरम पाण्याने अंघोळ करणे यालाच अभ्यंग स्नान असे म्हणतात. हा केवळ दिवाळीचे चार दिवस करण्याचा उपक्रम नाही तर नियमित करण्याचा उपक्रम आहे. यामुळे त्वचा तजेलदार व सुंदर राहते, प्रतिकार क्षमता उत्तम काम करते.

फराळाचे पदार्थ बनवितांना सर्व घटक पदार्थ चांगल्या प्रतीचे वापरावे. हल्ली कुणाकडे वेळ नाही आणि क्षमताही नाही की पुर्वी सारखे सगळे फराळाचे पदार्थ घरी केले जातील! पण परंपरा तर पाळली गेली पाहीजे म्हणून मग फराळाचे पदार्थ विकतचे आणले जातात. तेव्हा चांगले पदार्थ वापरलेअसतील याची खात्री करुन मगच विकत आणावे.

गोडाचे पदार्थ तळण्यासाठी साजूक तूप वापरावे घातक डालडा नको. पदार्थ तळतांना तेल किंवा तूप तापले की आंच मंद करा त्यातून धूर येता कामा नये. फराळाचे सर्व पदार्थ पचायला जड असतात त्यामुळे एकावेळी फार खाऊ नयेत. चव बघण्याच्या निमित्ताने किंवा फराळाला कुणी बोलावले तर जास्त खालले जाऊ नयेत या साठी हा सल्ला.

फराळ ही देखील दिवाळीचे चार दिवस नव्हे तर हिवाळा असे पर्यंत करावयाची गोष्ट आहे. पहाटे लवकर उठून अंघोळ झाल्यावर लवकर भूक लागते अशा वेळी चटकन खाता येईल असे पौष्टीक पदार्थ म्हणजे फराळ. मात्र ते पचविण्यासाठी चांगली पचन शक्ति हवी. भरपूर व्यायाम हवा.

चिवडा, शेव यांत तिखट मसाले यांचे प्रमाण नियंत्रित ठेवा. अन्यथा अॅसिडीटी, जळजळ होऊन आनंदावर विरजण पडेल.

वैद्य अभय कुलकर्णी व वैद्य सौ राजश्री कुलकर्णी
आयु:श्री आयुर्वेदीय हाॅस्पिटल व रिसर्च सेंटर
३४, परब नगर, स्वामी समर्थ केंद्रा जवळ इंदिरानगर,
नाशिक ४२२००९

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Your email address will not be published.